मराठी भाषेचा उगम व व्याकरण | marathi bhashecha ugam va vyakaran

१) मराठी भाषा उत्पत्ती विषयी :

भारत हा एक महान देश असून विस्तीर्ण भू-प्रदेशाने व्यापलेला आहे. येथील संस्कृतीत विविधता आढळते तसेच अनेक बोलीभाषा येथे बोलल्या जातात. भारतातील भाषा या प्रमुख्याने खालील दोन गटात विभागल्या गेल्या आहेत.

अ) इंडो-युरोपीयन/आर्यन भाषा: भारतातील आर्यांचे आगमन याविषयी अनेक मतमतांतरे आहेत, परंतु आयोगाने यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. यावरून आर्याचे आगमन हे युरोप खंडातून भारतात झाले असा निष्कर्ष निघतो. २०१२ मध्ये प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभिजात भाषा समितीच्या अहवालामध्ये इंडो युरोपियन / आर्यन असाच शब्द या भाषागटाला वापरलेला आहे. या गटातील भाषा प्रामुख्याने महाराष्ट्रापासून उत्तरेकडे आढळतात. म्हणून या भाषा गटातील भाषांमध्ये मूळ भारतीय भाषेतील तसेच आर्यांच्या भाषेतील शब्द आढळतात, आर्याचे साहित्य जरी संस्कृतमध्ये असले तरी लोकांच्या बोलीभाषा मात्र ज्या पूर्वीपासून होत्या त्याच होत्या.

ब) द्रविडीयन भाषा : दक्षिणेकडील ५ राज्यांत बोलल्या जाणाऱ्या भाषा द्रविडीयन गटात मोडतात.

भारतातील प्रमुख २ प्राचीन लिपी :

१) खरोष्ठी/गान्धारी लिपी: ‘खर’ या शब्दाचा अर्थ गाढव असा होतो, त्यामूळे गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी यावरून हे नाव पडले आहे. या लिपीचा आढळ सामान्यपणे भारताचा वायव्य सीमावर्ती भाग, अफगाणिस्तानचा कंधार प्रांत येथे कुशान राजघराण्याच्या काळात सापडतो. या लिपीचा प्रयोग तिसऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. बौद्ध उल्लेखात खरोष्ठी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो. या लिपीचा आर्यांच्या लिपीशी काहीही संबंध नाही.

२) ब्राह्मी लिपी : ब्राह्मी लिपी ही आर्यांची लिपी होती. बऱ्याच कालावधीनंतर याच लिपीचे पुढे देवनागरी लिपीत रूपांतर झाले. ब्रह्मदेवांनी तयार केलेली ही लिपी भारतातील बहुतेक लिपींच्या उगमाचे कारण ठरल्याने तिला भारतातील सर्व लिपींची माता म्हणतात.

खालील नकाशावरून आपल्याला आर्यांच्या आगमनाचा व ब्राह्मी लिपीच्या विकासाचा आलेख कळून येतो.


देवनागरी लिपी: दिव् धातुपासून देव या शब्दाची निर्मिती झाली आहे. याचा अर्थ प्रकाशमान असा होतो. ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे, आर्य स्वतःला देव मानत. ते नगरात राहत असत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी, म्हणून या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात..

देवनागरी लिपीला ‘बाळबोध’ लिपी असेसुद्धा म्हणत, कारण ती लहान मुलांना समजण्यासाठी अतिशय सोपी आहे. एकच चिन्ह वेगवेगळे ध्वनी दर्शक्ति नसल्याने व प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी मानतात. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तसेच या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरोरेषा शिरोरेधा असे म्हणतात.

मोडी लिपी : मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिला ‘मोडी लिपी’ असे म्हणत. मोडी लिपीला धावलिपी असेसुद्धा म्हणतात. इंग्रजांच्या काळात या लिपीचा वापर कमी झाला.

मराठी भाषेविषयी महत्त्वाचे : महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. मातृभाषा ही कुटुंबाची भाषा असते.

१ मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. राजभाषा ही त्या राज्याच्या कामकाजाची भाषा असते. व्यक्ती कुटुंबात जरी मातृ‌भाषा वापरत असला तरी त्याचे शिक्षण, व्यवसाय हे राजभाषेत होत असतात.

ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे :

१) गाथा सप्तशती (गाहा सत्तसई) हा २००० वर्षांपूर्वीचा ग्रंथ हा ज्ञात ग्रंथांपैकी आद्यग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ पैठणचे सातवहन राजे यांच्या काळात तयार झाल्याचे माणले जाते. बऱ्याच इतिहासकारांनी व व्याकरणकर्त्यांनी विवेकसिंधू हा आद्य ग्रंथ आहे असे नमूद केलेले आहे; परंतु अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार गाथा सप्तशती हा ग्रंथ आद्य ग्रंथ ठरतो.

२) २२२० वर्षांपूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख, की जो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटात असून त्यावर ‘महारठिनों ही अक्षरे कोरलेली आहेत, हा शिलालेख ज्ञात शिलालेखांपैकी आद्य शिलालेख मानला जातो.

३) शिलाहार केशिदेव (1) यांचा अक्षी शिलालेख अक्षी, जि. कुलाबा (९३४) हा शिलालेख नाणेघाट नंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन शिलालेख मानला जातो.

महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ :

१) सेतुबंध प्रवरसेनप्रवरसेन(इ.स. पाचवे शतक)
२) गौडवधवाक्पतिराज(इ.स. ८ वे शतक)
३) लीलावतीकौतूहल(इ.स. ८ वे शतक)
४) चिन्हकाव्यकृष्णलीलाशुक (इ.स. १३ वे शतक)
५) विवेकसिंधूमुकुंदराज(इ.स. १३ वे शतक)
६) भावार्थदीपिका / ज्ञानेश्वरीज्ञानेश्वर(इ.स. १३ वे शतक)
७) लीळाचरित्रम्हाइंभट्ट(इ.स. १३ वे शतक)
८) दृष्टांत पाठकेशवदेव व्यास(इ.स. १३ वे शतक)
९) पंचवार्तिकभीष्माचार्य(इ.स. १३ वे शतक)

अभिजात भाषा : जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती. त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक ‘काळातही टिकूण आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. यासाठी केंद्र सरकारकडून अशा भाषेच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. आतापर्यंत तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कानडी (२००८), तेलगू (२००८),मल्ल्याळम (२०१३), उडिया (२०१४) या ६ भाषांना हा दर्जा प्राप्त आहे. मराठी भाषेलासुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्यशासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी खालील समिती नेमण्यात आली होती.

अभिजात मराठी भाषा समिती : अध्यक्ष : प्रा. रंगनाथ पठारे स्थापना (राज्य शासन) १० जानेवारी २०१२

सदस्य : १. प्रा. हरी नरके २. डॉ. श्रीकांत बहुलकर ३. श्रीः सतीश काळसेकर ४. प्रा. आनंद उबाळे ५. डॉ. नागनाथ कोतापल्ले ६. डॉ. कल्याण काळे ७. श्री. परशुराम पाटील ८. प्रा. मधुकर वाकोडे ९. डॉ. मैत्रेयी देशपांडे अंतिम अहवाल सादर मे २०१३

अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष :

१) भाषेची प्राचीनता, तसेच ती परकिय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी.

२) भाषेची मौलिकता आणि सलगता

३) भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपन

४) प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते.

 

#1. अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा ?

#2. जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकूण आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो.

#3. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने…………..यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

#4. मराठीतील आद्य गदय ग्रंथ कोणता ? (TET २०२१)

#5. खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते?

#6. ‘सेतुबंध’ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

Previous
Finish

Results

अभिनंदन! 🎉 तुम्ही चाचणी यशस्वीरीत्या पास झाला आहात!👍

आणखी मेहनत करा, पुढच्या वेळी नक्कीच यश मिळवाल! 💯

Leave a Comment